सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
अंधारे यांनी केलेल्या पोस्टमध्ये थेट इशारा देत म्हटले आहे, “डायलॉगबाजी करण्यापेक्षा स्वतःच्या डोक्यावर असलेल्या अटकेच्या टांगत्या तलवारीचा आधी विचार करा.” या तीव्र शब्दांत केलेल्या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या पोस्टनंतर सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. काहींनी अंधारे यांच्या भूमिकेला समर्थन देत चाकणकरांवर टीका केली आहे, तर काहींनी या भाषेवर आक्षेप घेत राजकारणातील पातळी घसरल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या बाजूने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत असून येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज